अजंक्य, अमेय, अभेद्य, अद्वितीय आणि अप्रतिम असा जलदुर्गाचा एक सुंदर नमुना म्हणजे किल्ले जंजिरा. दंडा राजापुरी गावापासनू हाकेच्या अतंरावर मरुुड सागरात वसलेला हा किल्ला. तसं बघितला तर हा किल्ला उंचीने फारच थोडा पण विस्ताराने अवाढव्य आणि चारही बाजूने पाण्याने वेढलेला. हा किल्ला जिकंण्यासाठी मराठ्यांनी खपू प्रयन्त केला पण किल्ला घेता आला नाही. जंजिरावर नजर ठेवता यावी यासाठी संभाजी महाराज्यांच्या कारकिर्दीत किल्ल्याच्या समोरच मराठ्यांनी पद्मदुर्ग हा पहिला जलदुर्ग किल्ला बांधला. १६८२ साली पुनः मराठे किल्ला जिकंण्यासाठी चालनू आले. संभाजी महाराजांनी धाडसी निर्णय घेऊन, ओहोटीच्या वेळी समद्रुात भराव घालनू पूल बांधायचे ठरवले, जेणेकरून तोफांचा मारा जंजिराच्या बरुुज पर्यंत पोहचेल.
पण तोफांचा मारा बरुुज पर्यंत पोहचत नसल्याने बरुुज शाबतू होता. सिद्धी खरैतच्या कलाड बांगडी, लांडा कसम, चावरी या मोठ्या तोफांच्या माऱ्यांमुळे मराठ्यांची गलबते दर्यात बडुत होती. या चकमकीत मराठ्यांच्या तोफेचा मारा लागला आणि किल्ल्यात आग लागली. हा किल्ला मराठे जिकंले असे वाटले असतानाच मोघल सरदार हसन आली कल्याणमार्गे रायगडाच्या दिशेने असल्याचे समजल्यामुळे संभाजी महाराजांना ही मोहीम अर्धवट सोडून रायगडच्या दिशेने धाव घ्यावी लागली.
किल्ल्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे, या किल्ल्याचा मुख्य दरवाजा चारही बाजुंनी दिसत नाही. म्हणनूच कदाचित हा किल्ला अभेद्य राहिला असावा. आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे चारही बाजूला खारे पाणी असले तरी किल्ल्यात तीन गोडया पाण्याचे तलाव आहेत.
प्रत्येकाचा या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. थोडा वेळासाठी का म्हणेना मराठ्यांचा त्यावर वर्चस्व होतेच फक्त राज्य करू शकले नाही. त्या मुळे काहींच्या मते जंजिरा अभेद्य आहे तर काहींच्या मते नाही.
हा लेख लिहिण्यास कारण की हिदंवी स्वराज्याचे पहिले यवुराज आणि दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे भोसले यांचा आज जन्म दिवस. आज त्यांची ३६१ वी जयंती.
Abhilash Hole.
Check more photos here.